Wednesday, December 31, 2008

त्या वाळक्या काठीसोबत...

Posted by: प्रमोद (Pramod)
(Posted in Devanagiri script, please comment if you have font display issues we can guide you)

बाजारच्या रस्त्यावरून जाताना 
मी नेहमी माझ्या मित्राच्या दुकानात जायचो.
सारखा तराजूच्या पारड्यांवर मोजमाप करत असायचा.
सर्हाईतपणे विचारायचा--
"कुठं चालला आहेस?"
माझं उत्तर ठरलेलं-
"व्रुद्धाश्रमात"
पुन्हा ठरलेला प्रश्न:
"का वेळ घालवतोस वाया,
तिथं जाऊन?"
मी हसायचो.
शेजारच्या टपरीतून चहा मागवून
म्हणायचा,
"काय होतं तू तिथं जाऊन?"
"त्यांना बरं वाटतं इतकंच,
जाणवतं की त्यांच्या वेदना जाणणारं
आहे कु्णीतरी"
तो उशीला रेलत
आणखी एक घोट घेत म्हणायचा
"मग, त्यानं काय होतं?"
मग मी नुसता शांत व्हायचो.
मनातनं त्याच्या
असंवेदनशीलतेवर चिडायचो.
तो म्हणायचा,
"वेदना का जाणवतात, ठाऊक आहे?
संवेदनेमुळे--
वेदना संवेदनेची असते. अरे--
एकदम व्यावहारीक जगावं,
नफ्या-तोट्याचं गणित
सारखं मांडत रहावं!
तूच सांग, महत्त्वाचं गणित की संवेदना?
तुझं गणित पक्कं म्हणून तुला मिळाली
नोकरी, की संवेदना पक्की म्हणून?"
मी हसायचो.
"कुणीतरी द्यावी लागते संवेदना,
परत मिळण्यासाठी,
आणि
एकदा अंकुरली की
वाढत जाते आभाळभर
ज्ञानोबाच्या वेलीसारखी"
तो हसायचा नुसता.
पोरावर डाफरत,
"चाय मे पानी कम डालो"
सांगत पैसे काढून द्यायचा.
गल्ल्यातून.

***

परवा खूप दिवसांनी
गेलो त्याच्याकडे.
कधी नव्हे तो 
तराजूवर काही मोजत नव्हता.
काय करतो आहेस?
"स्पंदनं ऐकत बसलो आहे स्वतःची"
तो म्हणाला.
जवळ जाऊन बघितलं
तर भलं मोठं प्लॅस्टर पायाला
आणि शेजारी
एक मळकट काठी.
ओबड धोबड.
काय झालं रे?
काळजीनं म्हणालो तेव्हा,
"चालत्या लोकलमधून पडलो,
तरी बरं-
स्लो होती. नाही तर
राम नाम सत्य होतं"
मग?
"नंतर बराच वेळ पडलो होतो.
विव्हळत.
९:१०ची, ९:१५ची, ९:१८ ची
९:२०ची सगळ्या लोकल 
जात होत्या.
माणसांनी भरलेल्या.
पण
नाही आलं कुणी वळून
मदतीला."
कुणीच नाही??
"नाही. लेट मार्कचा लाल रंग
गहिरा असेल कदाचित,
रक्तापेक्षाही"
मग?
"तिथनंच आला चालत
एक लंगडा भिकारी
कष्टानं.
दगडांतून.
त्यानं दिली त्याची काठी मला.
ठेशन धा मिन्टावर हाय, बोलला.
खूप कष्टानं आलो चालत. तोसुद्धा--
खुरडत, सरपटत.
मग ऍम्ब्युलन्स आली. कुणीतरी नेलं
हॉस्पीटलमधे.
या धावपळीत--
ही काठी, त्या भिका-याची.
राहिली रे माझ्याकडे.
कसा चालत असेल?
कसा पोट भरत असेल तो?
येशील माझ्याबरोबर?
शोधू आपण त्याला.
येशील?"
चल.
उठला कष्टानं. 
तीच भिका-याची काठी घेत.
ओबडधोबड.
रीक्षानं जाताना,
ती काठी होती माझ्या हातात.
जाणवलं--
अचानक त्या ठार कोरड्याखट्ट काठीला
पानं फुटत आहेत--
वाढत्येय ती. बहरते आहे.
आभाळापर्यंत.
रीक्षातनं बाहेर 
शून्यात बघणा-या मित्राकडे 
नजर वळाली.
ज्ञानोबाच्या झाडाचं बी
रुजत होतं कुठेतरी त्याच्या काळजात.
त्या वाळक्या काठीसोबत.
ओबडधोबड.




Thursday, October 2, 2008

Yuva Meet - Oct 01, 2008

Pictures from the Yuva meet on 1st October, to celeberate the success of the two plays 'Runanubandh'(Jan2008 Rangadakshini) and 'Limit'(Sep2008 Ganeshotsav)

01 Oct 2008_Yuva Meet

Monday, September 15, 2008

YUVA's performance at GANESHOTSAV 2008

Here's the usual release!. Yuva's play LIMIT was a HIT in the Ekankika Spardha (One-act play competition) at Ganeshotsav 2008 organised by Maharashtra Mandal Bangalore.

AWARDS LIST:
BEST PLAY
BEST EXPERIMENTAL PLAY
BEST ACTOR
BEST DIRECTOR

More Details in the NATAK DATABASE PAGE which will be updated shortly.

Friday, August 15, 2008

HAPPY BIRTHDAY , HAPPY INDEPENDENCE DAY

We made it through the year. Our Blog is now a year old and Independence day is a good reminder:)

Well... we are independent now, but the Blog depends on us Yuva. Please continue to post, and start by posting your comments on how you think we fared in this last year.

Sunday, July 27, 2008

Bhaav Ranjan - Videos

Here are few videos of 'Bhaav Ranjan' presented by Maharashtra Mandal and Yuva on Saturday 26-Jul-2008. Hope you enjoy re-living those moments. Thanks Shirish for sharing them.

a) Dholki for ‘Reshmachya reghanni’ - Shirish

b) ‘Sunya sunya’ - Chitra
c) ‘Kanada raja’ - Omkar & Mandar

Here are the links to More Bhaav Ranjan videos

f) ’Dhundi kalyanna’ - Shruti & Omkar
g) ‘Shoor amhi sardaar’ - Mandar Gokhale
i) ’Pratham tuj pahata’ - Mandar Gokhale

Friday, July 11, 2008

'Bhaav Ranjan' - Invitation

'Bhaav Ranjan' - light musical programme : Saturday 26-Jul-2008

Click to see enlarged image.

MAP (to reach Maharashtra Mandal):
http://www.mmbangalore.org.in/ContactUs.asp

Tuesday, June 10, 2008

Happy Birthday Yuva!

Posted by : Priti(Sathe) Gadgil

Tomorrow (11 June 2008) Yuva enters its teens...13 years have passed since Yuva started as a group of teenagers (more like childhood friends) coming together to do something worthwhile in life! I feel so happy and proud to be a Yuva-ite, having being there right from (well almost) the beginning...

I have this big bag of Yuva material at home... old yuva badges, yuva entry forms, yuva-tshirt, "yuva-uwach", the Yuva constitution, logs of the various trips, pamphlets of the fund-raiser we'd organized after the Kargil war, the sports fest organized in Mandal, the blood donation camp conducted in Mandal, the many days we've spent with the orphanage kids, the "social work" trips to Dabgoli, the innumerous treks, yuva meetings, yuva parties, yuva album, AGPs and later e-AGPs (guys, you wouldn't know the fun we've had here! ;-)), stories of "ghyaa", YSP programmes, yuva at ganpati - fun at the hall decoration, overnight natak practices -- memories making me feel very very nostalgic!!

Yuva has been a platform to showcase one's talent (in whatever field it may have been) and mostly a place where friendships have been cemented. It has seen generations of people come and go. Yuva has stood the test of time on many occasions and i only wish to see it grow. I still am in touch with some ex-Yuva friends who still vouch strongly for Yuva as "Yuva has been the best thing that happened to me in my life"!

Tuesday, January 22, 2008

अंतरीची रत्ने

Posted by: देवेंन्द्र (Devendra)
(Posted in Devanagiri script, please comment if you have font display issues we can guide you)

'शब्द होते सजविले मी, सूर होते जुळविले
गीत होते गायचे पण काव्य होते हरविले'
चार-पाच वर्षांपूर्वी कपिलच्या बाबांकडून हे गाणे आम्ही ऐकले. बंगलोरमधील आम्हा हौशी कलाकारांचा - युवा संगीत प्रेमींचा - घोळका जयनगरला कपिलकडे जमला होता. तोपर्यंत कपिलचे बाबा गाण्यातले जाणकार आहेत, स्वतः छान गातात, पेटी वाजवतात इतपत आम्हाला माहिती होते, पण त्यांनी इतक्या छान कविता करून त्यांना चाली सजवल्या आहेत हे नव्यानेच कळत होते.

हल्लीच्या मराठी गाण्यांतून (काही सन्माननीय अपवाद वगळता) काव्य हरवले आहे याची खंत ज्यांना वाटते आणि जुन्याच्या छायेत वाढूनही नव्याचे कौतुक असणा-यांपैकी ते एक. तीच-तीच जुनी गाणी दळत बसण्यापेक्षा आपण काहीतरी दर्जेदार निर्मिती करावी, निवडक आठ-दहा गाण्यांचे रेकॉर्डिंग करुन एक कॅसेट काढावी हा त्यांचा संकल्पही तेव्हा त्यांनी बोलून दाखवला.

हा संकल्प सिध्दीस नेण्यासाठी त्यांनी प्रयत्न आधीच सुरु केले होते. मराठी भावगीते लोकप्रिय करण्याचा श्रीगणेशा ज्यांनी केला ते गजाननराव वाटवे काकांच्या कवितांवर प्रसन्न झाले आणि काही कवितांना त्यांच्या खास मधुर शैलीत चालीदेखील लावल्या. त्यातल्याच एका गाण्याने हृषिकेश रानडेच्या आवाजात सत्यजित केळकरच्या पेरुगेटाजवळच्या स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंगचा श्रीगणेशा झाला. हृषिकेश तेव्हा आजच्या इतका यशस्वी व्हायचा होता पण काकांनी त्याच्यातील गूण अचूक हेरला होता. त्यानंतर एकेक करत गाणी तयार होऊ लागली आणि विचारपूर्वक वेगवेगळ्या गायकांकडून ती गाऊन घ्यायचे काम सुरु झाले. 'भावगंध' हा युवाने बंगलोरच्या महाराष्ट्र मंडळात सादर केलेला कार्यक्रम ऐकून अश्विनी गोरे या 'युवा' गायिकेचीही काकांनी निवड केली. त्यांच्या बंगलोर मुक्कामात तिच्याकडून गाणी बसवून घेणे सुरू झाले.

विजय रायकरांचे गायकांकडून चाली बसवून घेणे हा गायकांसाठी नसला (!) तरी माझ्यासारख्या श्रोत्यासाठी एक आनंददायक अनुभव होता. पेटीवर साथ करत, एकेक जागा मनासारखी येईपर्यंत घोटवून घेणा-‍या काकांवर सुधीर फडके, गजाननराव वाटवे अशा दिग्गजांचे उत्तम संस्कार होते याची प्रचीती मला आली. या गाण्यांच्या चालीसुद्धा अभिजात भावसंगीताच्या थाटाच्या आहेत. भावसंगीत म्हणजे ज्यात गीतकाराचे शब्द, संगीतकाराची चाल, गायकाचा आवाज, उच्चार, वाद्यांची साथ, ताल, लय, स्वरन् स्वर भावनिर्मितीसाठी प्रामाणिकपणे झटत असतात! 'सखया डोळ्यांत तुझ्या' मधील सुंदर प्रेमभावना असो किंवा 'सांभाळुनी हिला घ्या' मधील दुःखाचे अश्रू लपवित आपल्या मुलीची पाठवणी करणा-या आईची आर्तता असो, भावसंगीतावरील निष्ठा त्यांनी प्रामाणिकपणे जपली आहे याची सतत जाणीव होते.

कंप्युटरने रेकॉर्डिंगच्या जगात केवढी मोठी क्रांती घडवली आहे याचा अंदाज सत्यजितच्या स्टुडियोत आला. तालाच्या एका साध्या ट्रॅकच्या आधारे रेकॉर्डिंग सुरु झाले, मग त्यात त्याने हळुहळू वाद्यांचे रंग भरले. पूर्वी अखंड गाणे एकदम रेकॉर्ड करीत असत. आता एकेक ओळ, लागल्यास त्यातला एखादा शब्द पुन्हा अधिक चांगला रेकॉर्ड करणे अशी प्रक्रिया असते. सलग गाणे म्हणण्यापेक्षा खरं म्हणजे हे जास्त कठीण आहे. हल्लीच्या सॉफ्टवेअरमध्ये स्वर कमी-जास्त झालेत का हेही तपासण्याची सोय असते. अश्या प्रकारे तालासुरात, उच्चारात सर्व प्रकारात एखादी ओळ उत्तीर्ण झाली की मगच पुढची ओळ! थोडक्यात म्हणजे भावनेला 'शास्त्रकाट्याची कसोटी' येऊ दे ही मर्ढेकरांची मागणी पूर्ण करणे! अश्या कठोर कसोटीला उतरलेल्या नऊ गाण्यांच्या या सीडीला 'अंतरीची रत्ने' असे समर्पक नाव लाभले आहे.

या रेकॉर्डिंगची आर्थिक बाजू आतापर्यंत काकांनीच सांभाळली होती. विशेष म्हणजे यातील एकाही कलाकाराने पैशासाठी काम केले नाही. श्रीधर फडकेंसारख्या नामवंताने मुंबईहून दोनदोनदा पुण्याला येऊन काकांना पसंत पडेपर्यंत रीटेक दिले, ते केले ख-‍या आनंदासाठी, काकांवरील प्रेमापोटी आणि त्यांच्या संगीतनिष्ठेवरील विश्वासासाठी. काकांनी स्वतःच्या पदरचे पैसे घालून केलेल्या या कामाची योग्यता पटल्यावर बॅंक ऑफ महाराष्ट्र मदतीला धावून आली. स्वरानंद प्रतिष्ठानने प्रकाशन सोहळ्याची जवाबदारी उचलली. ज्येष्ठ कवी श्री. गंगाधर महांबरे यांच्या हस्ते आणि व्हायलिनमधून 'गाणारे' श्री. प्रभाकर जोग यांच्या उपस्थितीत 'अंतरीच्या रत्नां'चे प्रकाशन झाले.

सुगम संगीत रसिकांपर्यंत पोहोचावे म्हणून कोणत्याही नफ्याची अपेक्षा न ठेवता, केवळ 'निर्मितीमूल्यात' ही सीडी 'वितरीत' करणे आता चालू आहे.

या अंतरीच्या रत्नांना रसिकांच्या ह्रुदयाचे कोंदण मिळावे हीच शुभेच्छा!


** खास बंगलोरच्या रसिकांसाठी ही सीडी दि.२५, २६ व २७ जानेवारी ला महाराष्ट्र मंडळात रंगदक्षिणी एकांकिका स्पर्धांच्या वेळी उपलब्ध असणार आहे.